♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पानशेत धरणात राजरोसपणे अतिक्रमण; पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष;भालवडी गावच्या हद्दीतील प्रकार 

पानशेत धरणात राजरोसपणे अतिक्रमण; पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष;भालवडी गावच्या हद्दीतील प्रकार 

(निलेश बोरुडे:संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पानशेत: पाटबंधारे विभागाचे अधिकारी एका बाजूला आंबेगाव खुर्द(ता. राजगड) येथील शेतकऱ्यांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली जमिनदोस्त करतात तर तेथून जवळच असलेल्या भालवडी गावच्या हद्दीत मात्र एका धनदांडग्या व्यक्तीकडून थेट धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिक्रमण होत असताना मूग गिळून गप्प आहेत. पाटबंधारे विभागाच्या या भूमिकेमुळे स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत असून संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या भालवडी गावच्या हद्दीत एका व्यक्तीने काही वर्षांपूर्वी जमिन खरेदी केलेली आहे. खरेदी केलेल्या जमिनीला ‘डॅम व्ह्यू ‘मिळावा म्हणून संबंधित व्यक्तीने थेट पाटबंधारे विभागाने अधिग्रहित केलेल्या क्षेत्रात कुंपण घालून ताबा मारण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी का गप्प आहेत असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी आंबेगाव खुर्द येथील काही शेतकऱ्यांची घरे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करुन पाडलेली आहेत. त्याही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिल भागात जमिन खरेदी केलेल्या धनदांडग्यांना पाण्यापर्यंत जमिनी लाटता याव्यात यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी अशा कारवाया करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. तसाच प्रकार भालवडी येथे सुरू आहे. थेट धरणक्षेत्रात कुंपण टाकण्यात आलेले असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी अद्याप का फिरकले नाहीत? यामागे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जशी सर्वसामान्य नागरिकांवर, शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येते तशी कारवाई येथेही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles