♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धोकादायक वाहतुकीबाबत अनेकदा पत्रव्यवहार पण पोलीस कारवाई न करता ‘सेटलमेंट’ करतात; सिंहगड चे वनरक्षक बळीराम वायकर यांचा गंभीर आरोप 

सिंहगड: सिंहगडाच्या घाट रस्त्यावर पंढरपूर वरुन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोच्या अपघाताबाबत ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ शी बोलताना सिंहगडचे वनरक्षक बळीराम वायकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तसेच काम करत असताना अनेक अडचणी येत असल्याचे शल्यही त्यांनी बोलून दाखवले आहे. सिंहगड घाट रस्त्यावरुन होत असलेल्या धोकादायक प्रवासी वाहतुकीवरुन मात्र वनरक्षक बळीराम वायकर यांनी पोलीसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

सिंहगडाच्या घाट रस्त्यावर अपघात होतात याला केवळ वन विभाग जबाबदार नाही असे सांगताना त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले आहे. धोकादायक वाहनांतून घाटरस्त्यावर प्रवासी वाहतूक होते त्याबाबत कारवाई करण्यासाठी अनेक वेळा पोलीसांशी पत्रव्यवहार केला मात्र पोलीसांनी कारवाई न करता ‘सेटलमेंट’ केली असा गंभीर आरोप बळीराम वायकर यांनी केला आहे. घाट रस्त्यावर नियमबाह्य प्रवासी वाहतूक होते याबाबत ‘माध्यमेही’ मूग गिळून गप्प आहेत असाही आरोप वायकर यांनी केला आहे.

वनरक्षक बळीराम वायकर यांनी पोलीसांवर केलेल्या आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे दिसून येत आहे कारण हवेली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस उभे असताना त्यांच्या समोरुन गोळेवाडी चौकातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून नेले जातात तरी पोलीस काहीच बोलत नाहीत. तसेच अनेक वाहने कालबाह्य झालेली आहेत तरीही पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसतात. आतापर्यंत नागरिक आरोप करत होते परंतु आता थेट वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांवर ‘सेटलमेंट’ चे आरोप केल्याने पोलीस पर्यटकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनरक्षक बळीराम वायकर यांनी केलेले ‘सेटलमेंट’ चे आरोप खोटे आहेत हे दाखवून देण्यासाठी हवेली पोलीस नियमबाह्य प्रवासी वाहतूक व कालबाह्य वाहणांवर कारवाई करणार का? की ‘सेटलमेंट’ ला प्राधान्य देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच वनरक्षकांनी केलेल्या आरोपांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दखल घेऊन तातडीने संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles